|
||||||||
![]() |
||||||||
|
|
||||||||
|
|
5
पु. ल. देशपांडे
अभ्यास : एक छंद माझ्या विद्यार्थी- मित्रांनो,मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे याचा खूप आनंद झाला. एकच गोष्ट जराशी खटकली, ती म्हणजे मी इथं बोलत असतांना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हांला दिसत नाही. मी तुम्हांला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही. तुमच्या आवडत्या सिनेनटासारखा मी देखणाही नाही. पोशाखाबिशाखाच्या बाबतीतही ही कानगोष्ट आहे म्हणुनच सांगतो, जरासा गबाळा आहे. आताच माझ्या लक्षात आलंय, की मी माझ्या बुशकोटाचं चौथं बटन तिसऱ्या काजात खुपसून तिसऱ्या बटनाला वाऱ्यावरच सोडलं आहे. पण ते काही का असेना, तुमच्याशी बोलतांना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं. शिवाय समर्थांनी म्हटलंच आहे, की वेश असावा बावळा. माझ्या अंगी नाना कळा काही नाहीत, तरीही 'वेश असावा बावळा, परि अंगी नाना कळा' हे समर्थांचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे. तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क ऑटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करुन म्हणेन, 'मित्र हो, भारतीय हो आणि बालनागरिक हो, जरा तुमचे कान इकडे करा.' मी शाळेत होतो त्या वेळी जेव्हा माझे गुरुजी 'इकडे कान कर' म्हणायचे, त्या वेळी ते काही निराळया कारणाने म्हणत असत. त्या अर्थाने नाही म्हणत मी... मी काय सांगणार आहे ते ऐकाल का? अशी विनंती करण्यासाठी म्हणतो आहे. माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो जरा इकडे कान द्या. तसं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही. कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काहीजणांनी आणि काहिजणींनी वाचली असतील. म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकांतून बोलालो आहे. लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय? पुस्तकांतून तुमच्याशी बोलणचं की नाही? माझी गोष्ट सोडा. मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकांतून निरनिराळया विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात. ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, साने गुरुजी बोलतात, जोतिबा फुले, टिळक, आगरकर, गडकरी, केशवसुत, बालकवी असे संत, विचारवंत, कादंबरीकार, नाटककार, कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत. तरी त्यांचं बोलणं मृत्यूसुद्धा थांबवू शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का, की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत? हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे? तुम्ही ज्या वेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा. परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलंत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरु होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो. कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे. कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खुप हौसेनं देतो आहे, अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरु होणार नाही. नव्या सत्राच्या आरंभी तुम्हाला सांगायची मुख्य गोष्ट ही, की गणिताच्या काय, भुगोलाच्या काय किंवा भाषा विषयाच्या काय कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि तेदेखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळया गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आता दोन-चार तास काढणार आहोत असे समजावे. म्हणजे जे पुस्तक उगीचच तुम्हाला परीक्षेची भिती घालत येतं, ते तुमच्या मित्रासारखं तुम्हाला वाटेल. नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणाऱ्या भित्र्य मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलंत, तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर मारुन पोहण्याचा आनंद मिळत नाही, तसा तुम्हांलाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही. मी कशाचा आनंद म्हणालो? ज्ञानाचा आनंद नाही का? थोडासा जड वाटलाना शब्दप्रयोग? तसा तो जड नाही. 'ज्ञान' म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करुन दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे 'अरेच्चा! आपल्याला कळलं' असे वाटून होणारा आनंद! मग तो एखाद्या यापूर्वी कधी न कलेल्या शब्दाचा असेल.., न सुटणारं गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल. तुम्ही सगळे विदयार्थी आहात नाही का? विदयार्थी म्हणजे तरी काय? विद् म्हणजे जाणणे, कळणे; अर्थी म्हणजे इच्छा असलेला. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरीपटावर नाव आहे म्हणुन त्याला विदयार्थी म्हणता येईल का? नाही म्हणून तुम्ही माना हलवल्यात ते दिसलं बरं का मला. तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय आहे बुवा, ते कळावं म्हणून आला आहात. या जगात लाखो वर्षापासून माणसांचं येणं आणि जाणं चालूच आहे. जन्मल्यापासून जास्तीत जास्त शंभर वर्षापर्यंत माणसाला या जगात मुक्काम ठेवता येतो. आता मी तुमच्याशी बोलत असतांना देखील टयँ.. टयँ.. असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील. मी किंवा तुमचे आईवडील, तुमचे गुरुजी, तुमच्या आधी काही वर्षे इथं आलो. त्या आधीही काही माणसं आली. आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळे तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी कळल्या आहेत. तुम्हाला अजून पुष्कळ गोष्टी कळायच्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी कळलेल्या नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात. 'अज्ञान' असणं यात
|
|
||||||
|
© WP Technology Inc. 2009
User-posted content is subject to its own terms. |